Sunday, 7 July 2013

My own blog and happy Kavita reading!


आयुष्याच्या संध्याकाळी……………
·         स्मिता शेखर , अहमदाबाद
·         SMITA SHEKHAR, Ahmedabad                                                 Feb 19, 2012
युष्याच्या संध्याकाळी वाढदिवस असा व्हायला हवा……….
गेल्या दिवसांच्या कडू आणि गोड आठवणी
आलेल्या अडचणी
अन त्यांना दिलेली मात
मिळवलेले प्रेम
अन जोडलेली नाती
मैत्रीचे रेशमी बंध
अन घडवलेल्या कर्तृत्वाची
सोनेरी पानं
लाडक्यांचे लाड
अन दोड्क्यांच्या शिव्या
सगळ्या घटना चित्रपट बनून
डोळ्या समोरून सरकायला हव्या

येणाऱ्या आनंदाच्या चाहुली
पावलोपावली  यायला हव्या
तृप्ततेचा हुंकार हृदयाने
आतून द्यायला हवा
आप्तांच्या मित्रांच्या चेहेऱ्यावरच्या
सुख दुखांच्या रेषा नजरेने अलगद टिपायला हव्या
रात्री बारा वाजल्यापासूनच
माझा फोन खणखणायला हवा
एकाला होल्ड वर दुसरयाला हलकेच कटवायला हवा

लंच आणि डिनर चा मेनू ठरवता ठरवता
न खाताच वजनाचा काटा दिसायला हवा
आणि त्याच्याकडे  दुर्लक्ष करून
केक चा बाईट घ्यायलाच हवा
रगडा-पेटीस बटाटावडा,
मैत्रीणीना आज तरी खिलवायला हवा
नवा ड्रेस शिंप्याने द्यायलाच हवा
रोज विसरत असले तरी
देवाला नमस्कार आज नक्कीच करायला हवा

एक मस्त धम्माल पार्टी
हातात वाईन चा प्याला यायलाच हवा
Past साठी no regrets म्हणत
आल्या दिवसाला welcome करायला हवा

Show must go on म्हणत
हसरा चेहरा अगदी आतून खरा खरा ठेवायला हवा
नवऱ्याकडे फेकलेल्या romantic नजरांचा
positive effect व्हायला हवा
त्याच्या कडून solitaire मिळायलाच हवा
सुनबाई ला किल्लीचा जुडगा आता द्यायलाच हवा
सार करता करता हळूच
हात काढून घ्यायला हवा
आपला ज्ञाना चा ठेवा
आता द्यायला हवा
दानाला हात पुढे व्हायला हवा
इतरांच्या गुंणाना वाव द्यायला हवा
माझ्यातल्या कलाकाराला
न्याय आता तरी द्यायलाच हवा

मैत्रींनीसह दंगा करायला हवा
Life time achievement च्या nomination ला
माझ्या नावाचा पुकारा व्हायलाच हवा
जगाव तर अस - असा भाव सर्वांच्या नजरेत
मला पाह्यलाच हवा
Exit ला टाळ्यांचा गजर ऐकायलाच हवा
आयुष्याच्या संध्याकाळी
वाढदिवस असा मस्त व्हायला हवा
व्हायलाच  हवा!

2 comments:

  1. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  2. आषाढस्य प्रथम दिवसे.....

    सौ. स्मिता शेखर कोरडे

    ‘महाराष्ट्र समाज’ भद्र आणि ‘विविधा’ यांनी संयुक्त पणे ९ जुलै,२०१३ ला कवी कालिदास दिन साजरा केला. उषा पोतनीस, वैशाली वर्तक, सुनिता कार्लेकर, नीला रिसवडकर, साधना पाटील, अनुराधा रानडे, रेखा गोस्वामी, जयश्री भावे, अपर्णा पिंपळस्कर, सुषमा चौसाळकर, चारुता पिपळापुरे, गीता पटेल, श्रीधर जोशी आणि स्मिता कोरडे यांनी स्वरचित कविता वाचल्या. सर्वच कविता विविध विषया वरच्या आणि श्रवणीय होत्या.
    चारुता पिपळापुरे यांनी कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन केले होते.
    महाराष्ट्र समाजाच्या, शिक्षण विभागाच्या चिटणीस सौ. स्मिता कोरडे यांनी समाजा तर्फे सर्व हौशी कवी/कवियत्री आणि श्रोतृवृन्दाचे आभार मानले.

    ReplyDelete